आजकालच्या धकाधकीच्या जीवनात मानवाला क्षणाचीही विश्रांती नाही. कोरोनाच्या महामारीमुळे जीवनाचे रहाटगाडगे थांबले आहे. संपूर्ण जगच जणू आपल्याच घरात तुरुंगवासात आहे. सतत बाहेर काम करणाऱ्या मानवाला घरी आपण आराम करू हे मुगजळ वाटायचे आणि ज्यावेळी त्याला आता सक्तीचा आराम आला आहे त्यावेळी त्याला आता घराबाहेर पडण्याची ओढ लागली आहे. याचाच दुसरा अर्थ मानवाला आपले आयुष्य घरी आणि बाहेर या दोन्ही ठिकाणी जगावे असे वाटते. हे करण्यासाठी जीवनात समतोल विचार आवश्यक आहे. आता समतोल विचार कुठून येणार?, तर समतोल विचार हे सकारात्मकतेमधून येणार.